
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि भांगर येथे झालेल्या हिंसाचारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मोठे विधान केले आहे. योगी मंगळवारी माधोगंजमधील रुईया गढी येथे पोहोचले. जिथे त्यांनी स्वातंत्र्यसैनिक राजा नरपत सिंग यांच्या विजय दिवस सोहळ्यात भाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ६५० कोटी रुपयांच्या ७२९ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. (CM Yogi Adityanath)
ममता बॅनर्जी दंगलखोरांना ‘शांतता दूत’ म्हणतात
यावेळी बोलताना ते म्हणाले, “लातो के भूत बातो से नही मानते. दंगलखोर फक्त काठ्यांचेच ऐकतील. ज्याला बांगलादेश आवडतो त्याने बांगलादेशला जावे. बंगाल जळत आहे, पण काँग्रेस-समाजवादी पक्ष मौन बाळगून आहे. ममता बॅनर्जी दंगलखोरांना ‘शांतता दूत’ म्हणतात आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांना मोकळीक दिली आहे. या प्रकारच्या अराजकतेला आळा घातला पाहिजे.” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. (CM Yogi Adityanath)
वक्फ जमिनींवर शाळा आणि विद्यापीठे बांधली जातील
पुढे बोलताना ते म्हणाले, वक्फ जमिनी परत घेतल्या जातील. या जमिनींवर रुग्णालये बांधली जातील, गरिबांसाठी घरे बांधली जातील आणि उंच इमारती बांधल्या जातील. येथे शाळा आणि विद्यापीठे बांधली जातील आणि गुंतवणुकीसाठी लँड बँक तयार केली जाईल. परंतु कोणालाही जमिनीवर कब्जा करण्याची आणि गुंडगिरी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जमिनीच्या नावाखाली सुरू असलेली लूट आता थांबणार असल्याने लोक चिंतेत आहेत. (CM Yogi Adityanath)
वक्फच्या नावाखाली जनतेची दिशाभूल
या लोकांना अडचणी येत आहेत, कारण आता त्यांच्या साथीदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. ते गुंड जे पूर्वी जनतेला लुटायचे. ज्यांनी भस्मासुराला पाळले होते, त्यांना आता भीती वाटते की ते त्यांना चावू लागतील. जमा केलेली अफाट संपत्ती लुटता कामा नये, म्हणूनच ते वक्फच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत आहेत. ते त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दिशाभूल होण्याची गरज नाही. पूर्वी रोजगाराचा अभाव आणि अराजकता होती. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. पूर्वी लोकांना स्थलांतर करावे लागत होते, पण आता चित्र बदलले आहे. २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दंगली होत असत. या दंगलखोरांवर लाठी हा एकमेव इलाज आहे, लाठीशिवाय ते मान्य करणार नाहीत. (CM Yogi Adityanath)
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस मुर्शिदाबादबाबत गप्प
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे सर्वजण मुर्शिदाबादबाबत गप्प आहेत. ते एकामागून एक धमक्या देत आहेत आणि बांगलादेशात घडलेल्या घटनांना पाठिंबा देत आहेत. जर त्यांना बांगलादेश आवडत असेल, तर त्यांनी तिथे जावे. असे लोक भारताच्या भूमीवर ओझे बनले आहेत. असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावलं आहे. (CM Yogi Adityanath)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community