इंग्रजांना हाकललं आता मोदी सरकारलाही हाकलून देऊ! ‘या’ काँग्रेस नेत्याचे मोठे विधान

त्यांना बाहेर काढण्यासाठी काम करणार असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

98

नाना पटोले… काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान आमदार. विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर पटोलेंना काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्षपद दिलं. त्यामुळए पटोलेंची ताकद वाढली. पण राज्यापेक्षा केंद्रीय पातळीवरील मोदी सरकारवरंच ते कायम टीका करताना दिसतात. आजवर अनेकदा पटोलेंनी नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्रातील मोदींचं भाजपा सरकार हे इंग्रजांपेक्षा भयंकर आहे. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी काम करणार असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

(हेही वाचाः त्यांच्या डोळ्यांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार! सामनातून प्रियंका गांधींवर स्तुतीसुमने)

मोदी सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर

देशाच्या जडणघडणीत स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसचा मोठा हात आहे. ती चौकट मोडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या सत्तेत असलेले मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे जसं काँग्रेसने इंग्रजांना देशातून हाकललं तसंच भाजपालाही सत्तेतून घालवण्यासाठी काम करुया, असा सल्ला नाना पटोलेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. तसेच वादविवाद विसरुन पुढे जाऊया असेही पटोले म्हणाले.

सामनातूनही भाजपावर निशाणा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हत्याकांडाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकारवर गेले काही दिवस शाब्दिक हल्ले करत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून बुधवारी या प्रकरणी टीका करण्यात आली आहे. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की शेतक-यांचे रक्त सांडणारा रक्त महोत्सव आहे, असा थेट सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की ‘रक्त महोत्सव?’ सामनातून केंद्र सरकारवर आगपखड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.