राज्यातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री Shambhuraj Desai यांनी सुनावले खडे बोल…..!

86
राज्यातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री Shambhuraj Desai यांनी सुनावले खडे बोल.....!
राज्यातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री Shambhuraj Desai यांनी सुनावले खडे बोल.....!
  • मुंबई प्रतिनिधी
मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली.त्यावरून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न  सोडवण्यापेक्षा,सामाजिक तेढ निर्माण करण्याला अधिक खतपाणी घालायचे असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद चिघळत ठेवून महाराष्ट्रातील शांतता भंग करायची असल्याचा आरोप करत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी विरोधकांना खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकारने मराठा समजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे १० टक्के आरक्षण दिले असून हे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. मात्र मराठवाड्यातल्या काही नेत्यांनी ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी लावून धरल्याने राज्यात गोंधळ निर्माण झाला असून या प्रश्नी दोन्ही समाजात सौहार्दाचे वातावरण कायम राहावे हीच सरकारची भूमिका आहे. मात्र या भूमिकेला तडा देण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोपही देसाई यांनी यावेळी बोलताना केला. (Shambhuraj Desai)
महायुती (mahayuti) सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी दांडी मारली.यामागे त्यांचा उद्देश काय आहे,असा परखड सवालही मंत्री देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला.देसाई म्हणाले की,सर्वपक्षीय बैठकीचे महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण देण्यात आले होते.त्याचवेळी संबधित विभागाकडूनही या नेत्यांना फोनद्वारे बैठकीची माहिती देण्यात आली होती.ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही,अशांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली असताना अचानक संध्याकाळी सहा वाजता विरोधकांनी निरोप दिला की बैठकीला येणार नाही. यावरुन विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. (Shambhuraj Desai)
निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर विनाकारण राजकारण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. सर्वपक्षीय बैठकीला पाठ फिरवणे आणि नंतर सरकारवरच टीका करणे हा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Shambhuraj Desai)
देसाई यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकले नाही.त्यावेळी मविआ सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? सर्वोच्च न्यायालयात भूमिका का मांडली नाही. (Shambhuraj Desai)
मराठा समाजातून पुढे आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधीही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित का राहिले नाहीत? अशा प्रश्नांची सरबत्ती करत,खरंतर विरोधकांनाच मराठा आणि ओबीसी समाजाबाबत काही देणंघेणं नाही म्हणूनच त्यांनी सरकारने बोलावलेल्या चर्चेकडे पाठ फिरवली.विरोधकांनी निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय दंगली घडवायचे मनसुभे रचलेत का? जाती जातीत,दोन समाजात व्देष पसरवून महाराष्ट्राचे वातावरण दूषीत करण्याचा कुटील डाव सर्व विरोधी पक्षांनी रचला आहे का?विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्या साठी प्रयत्न करायचे नाहीत.त्यांना फक्तं सामाजिक तेढ निर्माण करायची आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र पेटवून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न शरद पवार, उबाठा आणि काँग्रेस करत असून आता सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थिती राहिल्याबद्दल विरोधकांनीच मराठा समाजाची माफी मागायला हवी, अशी आग्रही मागणीही मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.