भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरु होईपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले आहेत. 9 जूनपर्यंत जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोणातीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने सातारा पोलिसांना दिले आहेत.
( हेही वाचा औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराबाईंच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय? )
मायाणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्र. कोडींबा घुटूगडे, महेश पोपट बोराटे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community