स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणार – मुनगंटीवार

100

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून या अंतर्गत जनजागृती करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ येत्या २ ऑक्टोबरपासून वर्धा येथे होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

( हेही वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी – बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर )

महाराष्ट्रातील ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल ऑफिसर

राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करताना जलतज्ज्ञांची विशेष मदत घेतली जाणार आहे. देश विदेशात जलतज्ञ म्हणून परिचित असलेले डॉ राजेंद्र सिंह यांची मदत यासाठी घेतली जाणार असून राज्य शासनाचे जलसंपदा, जलसंधारण, वन इत्यादी विभाग यामध्ये जोडले जाणार आहेत. नदी संरक्षण आणि संवर्धनसाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार असून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एका नोडल ऑफिसरची नियुक्ती केली जाणार आहे. हे नोडल ऑफीसर संबंधित नदीच्या विकासासाठी, पुनरुज्जीवनासाठी काम करतील. “आओ नदी को जानें” याचा मराठी अनुवाद लवकरच तयार करण्यात यावा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. ७५ नदी यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे आयुष्य चांगले कसे राहील, नदी ही अमृतवाहिनी कशी आहे, छोट्या नद्या पुनरुज्जीवीत केल्या तर त्याचा कसा फायदा होईल या सर्वांची माहिती नदी यात्रेच्या दरम्यान देण्यात येईल. असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात नदी महोत्सव आयोजित करणे, तसेच ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणे ही बाब अत्यंत आनंदाची आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेत जलतज्ज्ञांचा पूर्ण पाठिंबा असून सर्वांसाठी नद्यांचे प्रदूषण थांबविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे महत्वाचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.