“प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची कोंडी?

100

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला भरभरून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ११ लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. मात्र त्यांचा फॉर्मेट चुकल्यामुळे त्यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिज्ञापत्रावरून मोठं वक्तव्य केले आहे.

(हेही वाचा – नोटांवर गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो हवा; केजरीवाल यांची मागणी)

काय म्हणाले फडणवीस?

निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र लागत नाहीत. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्ह द्यायचे यासाठी निवडणूक आयोगाने नियम ठरवलेले आहेत. गेल्या २० वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी दिलेले निर्णय हे याचे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत. कोणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले आणि कोणाचे किती टिकले हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चालले आहे. फडणवीसांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची चर्चा सुरू असताना दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असेही स्पष्ट केले आहे. अशातच फडणवीस रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताऱावर चर्चा झाल्याच्या चर्चा असताना फडणवीस म्हणाले, जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.