‘मला तेव्हाच राग येतो जेव्हा…’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

118

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तसेच आपल्याला राग कधी येतो याचे कारणही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आपण सागर बंगल्यावर खूश असून इथे खूप सकारात्मकता असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना टोला देखील लगावला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

आपल्याला राग केव्हा येतो असा प्रश्न यावेळी फडणवीसांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला फडणवीस यांनी तितक्याच मिश्कीलपणे उत्तर दिले आहे. मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मला राग येतो, असे विधान फडणवीस यांनी केले. सध्या राजकारणात खूप कटुता आली आहे. डोक्यावरील केस गेल्यावर समजायचं की तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. माझ्यामध्ये क्ती सहनशक्ती आहे हे गेली 25 वर्ष तुम्ही राजकारणात पाहिलंच असेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाला मंत्रिपद मिळणार?; मुख्यमंत्री म्हणाले…)

मी सागर बंगल्यावरच खूश

दिवाळीनिमित्त मंगळवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. राज्यात देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे लागल्यानंतर फडणवीसांवर विरोधकांनी टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी सागर बंगल्यावरच खूश आहे. इथे खूप सकारात्मकता मिळते. तसेच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.