याच वाघाने डरकाळी फोडल्यावर महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पहिलं; केसरकरांचा ठाकरेंना टोला

90

नामिबियावरुन चित्ता आणण्याच्या केंद्राच्या कृतीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. वाघाला चित्ता म्हटले म्हणून वाघाचा चित्ता होत नाही, वाघ हा वाघच असतो. याचं वाघाने डरकाळी मारली तेव्हा महाराष्ट्रात काय झाले हे सर्वांनी बघितले, असा टोला राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंना लगावला आहे.

बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेलेले जे अजूनही शिल्लक लोक राहिले आहेत, ते काॅंग्रेस- राष्ट्रवादीला सोडण्याचे धाडस दाखवत नाहीत, असा टोमटा राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांची शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस करत होती, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. बाळासाहेबांचा विचार जीवंत रहावा म्हणून आम्ही उठाव केला आणि तो यशस्वी झाला. आम्हाला बाळासाहेबांचे विचार, प्रथा आणि परंपरा जीवंत ठेवायच्या आहेत. त्यासाठी जे जे करावे लागेल ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार, असे दीपक केसरकर म्हणाले.

( हेही वाचा: लव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच! )

बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणार 

बाळासाहेबांच्या विचारांचे सोने दसरा मेळाव्याला लुटणार आहोत. अनेक लोकांना भारतीय संस्कृती म्हणजे कमीपणा वाटतो. मात्र ते सत्तेच्या राजकारणात कसे चालतात? असा सवालही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. तसेच, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करायचे होते. तेव्हा अनेक लोकांनी कॅबिनेटला दांडी मारली होती. मात्र आम्ही नामांतर केले अशी खोटी जाहिरात केली. आम्हाला तो ठराव पुन्हा घ्यावा लागला. त्यामुळे आता राजकारण पुरे झाले, विकासाची कामे करुयात, असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.