देवनार कत्तलखान्याच्या नुतनीकरणाला भाजपचा विरोध

110

देवनार कत्तलखान्याच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून ही निविदा त्वरीत रद्द करावी, अन्यथा  याविरोधात राज्यपाल, लाचलुचपत विभाग, लोकायुक्त आणि सीसीआय यांच्याकडे तक्रार केली जाईल, प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल, असा इशारा देत मुंबई भाजपने देत देवनार कत्तलखान्याच्या नुतनीकरणाला तीव्र विरोध केला आहे.

म्हणून मुंबईकरांचे नुकसान 

शिवसेना आणि मुंबई महापालिकेतील त्यांच्या भ्रष्ट नेत्यांच्या हजारो कोटींच्या विविध निविदांमध्ये आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राटे मिळवून त्यांच्याकडून ‘वसुली’ करण्याच्या धंद्याने आता सर्व मर्यादा मोडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अहमदनगरस्थित भारतीय कंपनीकडून मंत्री आणि त्यांच्या पक्षाला किमान १६० कोटी रुपये मिळावेत, यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता जाणार आहे हे शिवसेनेला कळून चुकले आहे, त्यामुळे मुंबईकरांचे नुकसान झाले तरी ते सर्वत्र हातपाय मारत असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा  यांनी केला आहे.

निविदा येण्यापूर्वीच मशिनरी आयात

सध्या कत्तलखान्यात दररोज सुमारे ५०० ते ६०० जनावरांची कत्तल केली जाते. नूतनीकरणासाठी निविदा भरणाऱ्या कंपनीला  १२००० जनावरांच्या कत्तलीचा अनुभव प्रदान करण्यात आला आहे, ही अट कोणतीही भारतीय कंपनी पूर्ण करू शकत नाही. या निविदेकरता अशाप्रकारे अटी बदलण्यात आल्या की संपूर्ण भारतातील अन्य कोणतीही कंपनी निविदा भरण्यास पात्र नाही. सल्लागाराच्या सूचनेवरून अहमदनगरच्या कंपनीने निविदा येण्यापूर्वीच कोरियातून १०० कोटी रुपयांची मशिनरी आयात करण्याची ऑर्डर दिली असल्याचा आरोपही कोटेचा यांनी केला. सध्याचे नूतनीकरणाचे टेंडरच नाही तर चार वर्षांनंतरचा कत्तलखाना चालवण्याची निविदाही काढण्यात आली आहे. 4 वर्षांपूर्वीची निविदा कोण भरणार, यासाठी कोणती मशिनरी लागणार असून ती चालवण्यासाठी किती खर्च येईल, याची माहिती नाही.

अधिक जनावरांच्या कत्तलीला परवानगी दिली

कत्तलखान्याच्या नूतनीकरणाच्या निविदेत पर्यावरण आणि प्रदूषणाच्या मुद्दय़ाची दखल घेतली गेली नसल्याचे निविदेतील इतर अटींवरूनही दिसून येते, असे भाजपचे माजी नेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. तर भाजप नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी, प्राण्यांच्या अशा अतिरिक्त कत्तलीमुळे लाखो लिटर अतिरिक्त पाणी आणि कार्बन उत्सर्जनाची प्रक्रिया होणार आहे. याची चिंता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना का वाटत नाही, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षानुवर्षे अहिंसावादी संघटना आणि जैन धर्माच्या प्रतिनिधींना मुंबईत गरजेपेक्षा जास्त जनावरांची कत्तल करू देणार नाही, असे आश्वासन देत असल्याचे भाजप आमदार पराग शाह यांनी केला आहे. देवनारची सध्याची क्षमता २० पट अधिक जनावरांच्या कत्तलीला परवानगी दिली जाईल. उर्वरित सर्व मांस कंपनी निर्यात करणार  आहे. म्हणजेच मुंबईकरांचा पैसा आणि खर्च होणार असून यामध्ये खासगी कंपनीची कमाई  होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.