‘नाराज होऊ नका, कामाला लागा’, फडणवीसांचे नाराज आमदार-कार्यकर्त्यांना आवाहन

92

राज्याच्या राजकारणात चालू असलेल्या सत्ता संघर्षाला गुरुवारी अल्पविराम मिळाला. शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ‘पुन्हा येणार’ या अपेक्षा मावळल्या. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या जवळील काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण याचबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांची समजून काढत त्यांना पुढच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.

तयारीला लागा…

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली. यावेळी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त करणा-या आमदार व कार्यकर्त्यांची त्यांनी समजूत काढली. हे सरकार आपलंच आहे, कोणीही नाराज होण्याची गरज नाही, असे यावेळी फडणवीस यांनी नाराजांना सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकांसाठीही तयारीला लागण्याचे आदेश यावेळी फडणवीसांनी आमदारांना दिले.

(हेही वाचाः शिंदे सरकार राज्यपालांना पाठवणार 12 आमदारांची नवीन यादी)

कामे पूर्णत्वास न्यायची आहेत

सध्याच्या सरकारमध्ये सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी योग्य तो निधीवाटप केला जाईल. आपल्याला आपल्या जनतेसाठी काम करायचे आहे. गेल्या अडीच वर्षात जी कामे रखडली आहेत, ती पूर्णत्वास न्यायची आहेत. कोणाच्या विभागातील कामे रखडली असतील तर तेही मला सांगा, असेही फडणवीस यावेळी आमदारांना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.