वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणा-या सरकारसाठी संजय राऊत ‘जो’ शब्द वापरतात तोच वापरावा लागेल

114

ठाकरे सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी भाजपकडून गडचिरोली येथे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारला गरिबांची चिंता नसून केवळ बेवड्यांची चिंता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेश्यांना मदत म्हणून देण्यात येणा-या पैशांवरही या सरकारने डल्ला मारला असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

वेश्यांच्या पैशावर मारला डल्ला

दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो, त्यांना कोरोना काळात मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना 5 हजार रुपये देण्याची घोषणा या सरकारने केली. पण यातही या सरकारची वाईट नियत समोर आली. नांदेडमध्ये वेश्यांना द्यायचे पैसे या सरकारने आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या संस्थेला वाटून टाकले. मी ही घटना विधानसभेत देखील मांडली आहे. त्यामुळे वेश्यांना द्यायच्या पैशामध्येही डल्ला मारणा-या या सरकारला काय म्हणतात हे मी सांगणार नाही. संजय राऊत जो शब्द नेहमी वापरत असतात, तो या सरकारसाठी वापरायला हवा अशी तिखट टीका फडणवीस यांनी केली आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्रामध्ये बेवड्यांचं सरकार आलं आहे, फडणवीसांचा गंभीर आरोप)

आमचं सरकार आलं तर…

या सरकारने केवळ आमच्या पाठीत खंजीर खुपसला असता तरी चाललं असतं, पण या सरकारने सर्वसामांन्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राज्यात भाजपचं सरकार असताना शेतक-यांना वीज देण्याची योजना केली. पण ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करण्यासाठी ही योजना बंद केली. पण भाजपचं सरकार आल्यानंतर या योजनेमार्फत आपण शेतक-यांना ही वीज पुन्हा उपलब्ध करुन देऊ, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.