नवाब मलिकांना वाचवण्यापेक्षा अर्धी धडपड…, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

106

नवाब मलिक यांचे डी गँगशी संपर्क असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्यानंतर आता विरोधी पक्ष भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी धडपड करण्यापेक्षा थोडीशी धडपड जर ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी केली असती तर आज ओबीसी समाजाला न्याय मिळाला असता, अशी टीका आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(हेही वाचाः उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संबंध?, सोमय्यांच्या विधानाने खळबळ)

…तर ओबीसी आरक्षण वाचलं असतं

दोन वर्ष हे सरकार ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाहीत. मात्र त्यावेळी डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रिमंडळात रहायला पाहिजेत यासाठी महाविकास आघाडी सरकार धडपड करत आहे. पण यापेक्षा अर्धी धडपड जरी ओबीसी आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी केली असती, तर ओबीसी आरक्षण कधीही गेलं नसतं, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सोमय्यांनी मागितला खुलासा

नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे आता सिद्ध झालं आहे. पण जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा नवाब मलिक यांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध आहेत का, याची महाराष्ट्राला काळजी वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याबाबतचा खुलासा करावा, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचे एका पेक्षा एक ‘टीझर’, फक्त एका क्लिकवर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.