‘अशी जोकरसारखी विधानं ते नेहमीच करतात’, फडणवीसांचा राऊतांना टोला

113

राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजप ईडीसारख्या यंत्रणांचा कसा वापर करत आहे हे सांगताना राऊत यांनी भाजपवर टीका केली, त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीसांचं प्रत्युत्तर

आमच्याकडे देखील यंत्रणा आहेत फक्त ईडी आमच्याकडे नाही. जर फक्त 48 तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. अशी जोकरसारखी विधानं ही संजय राऊत रोजंच करत असतात. मी त्यांना जोकर म्हणत नाहीये, त्यांच्या अच्या रोजच्या विधानांना रोज काय उत्तर द्यायचं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

(हेही वाचाः विधान परिषदेचीही रणधुमाळी होणारच, अर्ज मागे घेण्याची मुदत संपली)

भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील

विधान परिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उभे आहेत. महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपाच्या पाच उमेदवारांमध्ये ही लढाई रंगणार आहे. याचबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपले पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत अंतर्गत कलह खूप आहे, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात आम्हाला नक्कीच यश येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.