मोदींना हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील आवाहनाचा फडणवीसांकडून समाचार 

145

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा, मेलेले आहेत त्यांना हजर करा, काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांची ही विधान आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत येथे बोगस मतदान घडविण्याची योजना आखली जात आहे, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे. तसेच निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी यावेळी केली. याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले फडणवीस?

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी दोन्हीही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कसब्यात अल्पसंख्याक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत उपरोक्त विधान मुस्लिम नेत्याने केले. मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असे सांगणार असतील तर हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसते. त्यामुळे याचा तर निषेध आमच्याकडून होणारच. मताचे ध्रवीकरण राष्ट्रवादीकडून जे चालले आहे. ते लोकांना चालणार नाहीच, परंतु आम्ही हे खपवून घेणार नाहीत, अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केले जात आहे. आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही जंग साठी हाजीर करा म्हणतात. इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती. हा तर एक प्रकारे जिहादच आहे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.