Devendra Fadnavis: “… तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत!” फडणवीसांची स्पष्टोक्ती

83
Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis: "... तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत!" फडणवीसांची स्पष्टोक्ती

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) ठार झाला होता. या घटनेवर विरोधक आणि न्यायालयाकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. यावर आता ज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. गुरुवारी ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’च्या व्यासपीठावरुन बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, “एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत.” असं स्पष्ट मत फडणवीसांनी मांडलं.

…तर तुम्ही हा विचार करत बसाल का?
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून, त्याचे लॉक उघडून फायरिंग करु शकतो का? पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी घालतात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही. पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.