ते पुन्हा आले…

79

२०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाची खिल्ली उडवली गेली. मात्र आपल्या राजकीय कौशल्याने महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अर्थात पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणण्यात देवेंद्र फडणवीस यांनी जी मोलाची भूमिका बजावली त्या कामगिरीचे कवितेच्या माध्यमातून केलेले वर्णन…

ते पुन्हा आले…

ते पुन्हा आले
चाणक्य बनून…
ते पुन्हा आले
चंद्रगुप्तला घेऊन…

ते पुन्हा आले
जनादेश मानून…
ते पुन्हा आले
युतीधर्म पाळून…

ते पुन्हा आले
रणशंख फुंकून…
ते पुन्हा आले
परधर्म झुगारून…

ते पुन्हा आले
भविष्य ठरवून…
ते पुन्हा आले
नियतीला बदलवून …

ते पुन्हा आले
सूत्रांना चकवून…
ते पुन्हा आले
मित्रांना पटवून…

ते पुन्हा आले
मल्लांना लोळवून…
…आणि ते पुन्हा आले
पूर्वसूरींना स्मरून…

– निलेश मदाने

[email protected]

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.