फडणवीसांचा मनाचा मोठेपणा! बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला – एकनाथ शिंदे

93

सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येणाऱ्या आमदारांची संख्या पाहता आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती. महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते. मर्यादा येत होत्या. तसेच हा वेगळा निर्णय राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवले, त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे पाठबळ आहे. ५० आमदार एकत्र आहोत. अडीच वर्षांपूर्वी काय घडले ते सगळ्यांना माहिती आहे. या काळात आम्ही मतदारसंघातील कामे, अडचणी याबाबत वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. परंतु आमदारांमध्ये असलेली खदखद, मतदारसंघातील प्रश्न आणि पुढच्या निवडणुकीत लढवणे आणि जिंकणे ही समस्या सांगितली.

(हेही वाचा औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाचा निर्णय अवैध! फडणवीसांचा दावा)

हे सरकार लोकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध 

जे काही घडले जी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करू. या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम करू. इतक्या मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. आत्ताच्या राजकारणात काय होईल हे पाहता. परंतु संख्याबळ असताना पद दुसऱ्याला देणे हा त्याग आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, ५० आमदारांमध्ये काही मंत्री आहेत. आपापल्या मतदारसंघात ताकदवान आहे. एकीकडे खूप मोठे नेते आहे. एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. ५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आमदारांनी केले. या आमदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊन देणार नाही. आता आपली ताकद वाढली आहे. मजबूत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल. हे सरकार लोकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा नगरसेवक ते मुख्यमंत्री : एकनाथ शिंदेंची २५ वर्षांची कारकीर्द)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.