महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; शिवसेनेचेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री! 

96

शिवसेनेतून नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देईल आणि त्या नव्या, पर्यायी सरकारचे मुख्यमंत्री हे एकनाथ  शिंदे असतील, असा धक्कादायक निर्णय भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, ३० जून रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केला. देवेंद्र फडणवीसांच्या धक्कादायक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

काय म्हणाले फडणवीस?

शिवसेनेतील एकनाथ शिंदे याच्या गटातील आमदार यांची महाविकास आघाडीत कुचंबणा होत होती. ज्यांच्याविरोधात लढलो पुन्हा त्यांच्याशीच लढायचे आणि हरलेल्या सदस्यांना निधी दिला जात असेल तर या गटाने युती तोडण्याचा विचार मंडाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या आमदारांऐवजी दोन्ही काँग्रेसला महत्व दिले हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर एक पर्यायी सरकार देणे गरजेचे बनले. आम्ही लोकांच्या डोक्यावर निवडणूक लादणार नाही. त्यामुळे शिंदे यांचा विधिमंडळ गट आणि भाजपचा गट आणि १६ अपक्ष आमदार या सगळ्यांचे पत्र राज्यपालांना दिले. कुठल्या तरी मुख्यमंत्री पदासाठी आम्ही हे करत नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल ते मुख्यमंत्री होतील त्यांना भाजप समर्थन देईल, साडेसात वाजता शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी होईल, मग आम्ही  शिंदे यांच्या सोबत असलेले आणि भाजपमधील आमदार हे मंत्रीमंडळ विस्तारात असतील, मी सरकार बाहेर असेन, हे सरकार योग्य प्रकारे चालले यासाठी या सरकारला मी पूर्णपणे साथ देईन, बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले हिंदुत्व हे भाजप सतत मांडत असते, तो विचार आणि पंतप्रधान मोदींनी दाखवलेले व्हिजन आम्ही पुढे घेऊन जाऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेऊ! 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती आणि त्यामाध्यमातून भाजप १०५ जागा जिंकली आणि शिवसेना ५६ असे अपक्ष १७० निवडून आले होते. साहजिकच अपेक्षा होती कि भाजप आणि शिवसेनेचे सरकार तयार होईल, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषण केली होती, पण दुर्दैवाने निकाल आल्यावर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना यांनी वेगळा निर्णय घेतला होता, विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ज्यांचा विरोध केला, हिंदुत्वाचा, स्वा. सावरकर यांचा विरोध केला अशा दोन्ही काँग्रेससोबत शिवसेनेने आघाडी केली आणि भाजपाला बाहेर ठेवले, हा खरा तर जनमताचा अपमान होता. महाविकास आघाडी आली, मागील अडीच वर्षांत या सरकारने युतीच्या कामांना स्थगिती दिली आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला, दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले, एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदचा विरोध केला, दुसरीकडे त्याच्याशी संबंध आहे म्हणून एक मंत्री जेलमध्ये गेला, तरी त्याला मंत्री पदावरून हटवले नाही. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झाले, राज्यपालांचे पत्र आले तरी मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते, तरीही घेतले ते निर्णय वैध म्हणात येणार नाही तरीही त्याला समर्थनच असणार, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.