‘शेवटच्या श्वासापर्यंत फडणवीस यांच्यासोबत राहणार’, ‘या’ माजी मंत्र्यानं व्यक्त केला विश्वास

87

माजी मंत्री सदाभाऊ खोत हे नाराज असून त्यांना आमदारकीपासून डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय केला, यानंतर सदाभाऊ खोत भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहील. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, देवेंद्र फडणवीस हे सामान्यासाठी लढत असतात. प्रस्थापिता विरोधात आणि घराणेशाही विरोधात त्यांचा लढा कायम आहे. अशा नेत्यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे. रयत क्रांती संघटना ही त्यांच्याबरोबरच घटक पक्ष म्हणून जोडली गेली आहे. त्यामुळे अशा नेत्यांबरोबर मी शेवटपर्यंत राहणार असल्याचा विश्वास माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे नाराज आहे. त्यांना आमदारकी मिळाली नाही म्हणून ते भाजपसह राहणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आली. याशिवाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत नेमका कोणता निर्णय घेणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या होत्या.

(हेही वाचा – आता ‘आधार’वरून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, UIDAI ची मोठी माहिती!)

फडणवीसांवर जीव ओवाळून टाकला तरी…

देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोत यांना आमदारकी पासून डावलले, त्यांना कुठेही संधी दिली नाही अशी चर्चा सुरू असतांना सदाभाऊ खोत यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी असे म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे सामान्यासाठी लढत असतात. प्रस्थापितांविरोधात आणि घराणेशाही विरोधात त्यांचा लढा कायम आहे. अशा नेत्यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल आणि रयत क्रांती संघटना ही त्यांच्याबरोबरच घटक पक्ष म्हणून जोडली गेली आहे. त्यामुळे अशा नेत्याबरोबर मी शेवटपर्यंत राहणार असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.