शरद पवार लव्ह जिहादवर का बोलत नाहीत?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

124

सकल हिंदू समाजाकडून रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दादर येथील शिवाजी पार्क ते प्रभादेवी असं मार्गक्रमण करणाऱ्या या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिंदे गट, भाजप नेते आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे मोर्चात महिलांची संख्या मोठी होती. तसंच याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते देखील सहभागी झाले होते. यावेळी एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार लव्ह जिहादवर का बोलत नाहीत?, असा सवाल सदावर्तेंनी यावेळी केला.

नक्की काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

‘पाकिस्तानी यांच्या नीच विचारांमधून जे लव्ह जिहाद चालू झालं, त्या लव्ह जिहादला दफन करण्यासाठी मुंबईतील हिंदू एकवटला. सरकारला साकटं घालतं आहे की, लव्ह जिहाद विरोधी कायदा आणा. दाऊद इब्राहिमचा विचार दफन करा. बाबरचा विचार दफन करा. हे इथं संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करू लागले. ह्या सगळ्याबाबी लक्षात घेता आज हिंदू एकवटला आहे. शरद पवारांच्या तोंडाला आजार झाला आहे. दुसऱ्या विषयावर बोलायला सुचतं, लव्ह जिहादवर बोलायला सुचतं का नाही? हैदराबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही? या सगळ्यांना प्रश्न विचारण्यासाठी, उघडं पाडण्यासाठी आणि लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’ असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

दरम्यान मुंबईतील जन आक्रोश मोर्चात लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचं कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही या मोर्चात सहभागी झाल्याचं सांगण्यात आलं. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. तसंच महिलांकडेच मोर्चाचं नेतृत्व होत. प्रभादेवी परिसरात मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या राज्यात आज लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या मुली, तसंच महिला या आज असुरक्षित झाल्या आहेत. हिंदू मुली, महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी श्रद्धा वालकर याचं ताजे उदाहरण आहे. अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. यामुळे याबाबत कायदा करावा, दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलक करत होते.

(हेही वाचा – मुंबईतील जिहादींना नवाब मलिक, अस्लम शेख पोसतात; नितेश राणेंचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.