हलाल विरोधातील लढाई आता सुरु, परिणाम दिसताेय – माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री

124

हलाल आता केवळ मांस विषयांपुरता राहिला नाही, तर ही विश्वावर वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरु झाली आहे. त्याला हलालचे स्वरूप देण्यात आले आहे. परंतु आता सत्ता बदली आहे, व्यवस्था बदलली आहे. आता देशाची आर्थिक हवा बदलली आहे, त्याचे परिणामही समोर आले आहेत. ‘रेड मीट’च्या मॅन्युअलमधून ‘हलाल’ शब्द हटवला आहे. दिल्ली महापालिकेनेही हलालबाबत निर्णय घेतला आहे. यापुढे दिल्लीत हॉटेल्सला ते ग्राहकांना देत असलेले मांस झटका आहे की हलाल हे सांगणे बंधनकारक आहे. आता ही लढाई सुरु झाली आहे, ही लढाई पुढे लांबपर्यंत जाईल, असेही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री म्हणाले.

हिंदू संघटनांनी हलालला विरोध करावा  

भारतात देश विरोधी ताकद आहे, त्यांची काय अपेक्षा आहे. २२ वर्षांपूर्वीच परिस्थिती गंभीर झाली होती, तेव्हाच खाटीक समाजाच्या व्यवसायाचे पतन सुरु झाले होते. आज तिच खाटीक जमात नाईलाजास्तव हलालच्या समर्थनार्थ आली आहे. मी याबाबत खाटीक समाजात जागृती केली, तेव्हा ते मला स्वतः ‘या विषयात हात घालू नका, आमच्या रोजी रोटीवर परिणाम करेल’, असे म्हणाले होते. पण आता खाटीक समाज सजग झाला आहे. आता हलाल ही समस्या संपण्याच्या मार्गावर आली आहे, असे दिसत आहे. जागृती झाली आहे. आता हिंदू संघटनांनी हलालला विरोध करावा, असेही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री म्हणाले.

(हेही वाचा हलाल विरोधातील नेतृत्व राज ठाकरेंकडे द्या, मग बघा मनसेचे खळ्ळखट्याक – यशवंत किल्लेदार)

हिंदू विभागले गेलेत

भारतातील सर्व मुसलमान, ख्रिस्ती हे हिंदूच होते ते धर्मांतरित झाले आहेत. एकही मुसलमान किंवा ख्रिस्ती हा परदेशातून आलेला नाही. शीख समुदाय देखील १५व्या शतकात आला. दलित १२व्या शतकात भारतात नव्हते. आदिवासी हेही भारतात नव्हते. मग हे पाच समुदाय भारतात कसे आले. तर ज्या ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली त्यांचा सामना ब्राह्मण आणि क्षत्रिय करायचे, त्यावेळी परकीय आक्रमणातून ब्राह्मण, क्षत्रियांची हत्या व्हायची, त्यातील काही मुसलमान आणि क्षत्रिय हे घाबरून मुसलमान बनले, त्यातील क्षत्रिय हे खान, पठाण बनले, ब्राह्मण शेख बनले. त्यांचा स्वाभिमान तोडण्यासाठी त्यांना कमी दर्जाचे काम करायला लावले, त्यांना दलित संबोधण्यात आले. १२व्य शतकाच्या आधी भारताचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, तेव्हा ४ वर्ण आणि ३६ जाती १२६ गोत्र होते, आज ४५०० जाती ५० हजार उपजाती झाल्या आहे. आपण हिंदू विभागले गेलो आहोत. आता देश नवनिर्मितीसाठी तयार झाला आहे. हिंदू धर्म म्हणजे सुसंकृत मानव बनवण्याची पद्धती आहे. हलालवाले जर या हिंदू संस्कृती, पद्धतीचा अवलंब करतील, तर तेही बदलतील. याच माध्यमातून संपूर्ण पृथ्वीवर हिंदू संस्कृती असेल. या परिषदेतून बाहेर पडणाऱ्यांनी राजदूताचे काम करावे आणि बाहेर जाऊन हलाल विषयावर जनजागृती करावी, असेही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री म्हणाले.

(हेही वाचा हलाल विरोधी आंदोलन संधी, आर्थिक बहिष्कार टाकून आपला पैसा हिंदू व्यापाऱ्यांनाच द्या, रणजित सावरकरांचे आवाहन)

मुंबईत हलाल सक्ती विरोधी परिषद संपन्न

halal 4

भारतात हलालच्या माध्यमातून मुस्लिमांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याची, तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी ‘ब्लॉसम मीडिया’कडून ‘हलाल शो’ आयोजित केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृह येथे हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन रविवार, ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी लिहिलेल्या ‘हलाल जिहाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवला, अखिल भारतीय खाटीक महासंघाचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, वीरशैव लिंगायत महासंघाचे डॉ. विजय जंगम, झटका व्यवसायी महासंघाचे संतोष गुप्ता हे उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.