Hasan Mushrif : जितेंद्र आव्हाड हे देवेंद्र फडणवीसांच्या पाय पडले होते – हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

125

अजित पवार यांनी कुणावरही टीका करायची नाही, असे सांगितले पण जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या समोर आम्हाला गद्दारांचे रक्त असे म्हटले, त्यामुळे आमचा राग अनावर झाला आणि मी त्यांचा समाचार घेतला, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

स्वतःला पुरोगामी समजणारे जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा ते जयंत पाटील, अजित पवार यांना घेऊन अध्यक्षांच्या दालनात गेले, तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या ते पाया पडले आणि म्हणाले मी विधान परिषदेची निवडणूक लढवणार नाही, मला विधानसभेला पाठवा, अशी विनंती केली होती, असा धक्कादायक खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाची सभा होती, त्यावेळी हसन मुश्रीफ बोलत होते. आम्ही जितेंद्र आव्हाड यांनी पायथानाची भाषा केली, त्यामुळे मीही जितेंद्र आव्हाड यांना कोल्हापुरातील चप्पल करकर वाजते ती चप्पल मारू असे म्हटले. मी माझ्याकडील खात्याचा राज्याच्या विकासासाठी उपयोग करेन असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे माझ्या जीवनाचा भाग)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.