मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुमच्या राज्यात मुसलमान सुरक्षित आहेत का? त्यावर योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित आहेत. आमच्या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत तर मुसलमान देखील सुरक्षित आहेत.” यावेळी त्यांना ‘बुलडोझर जस्टीस’बाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “जो व्यक्ती जसा व ज्या भाषेत समजून घेईल त्याला त्या भाषेत समजावलं जाईल.” (CM Yogi Adityanath)
वक्फ बोर्ड आणि जमिनींवरून चालू असलेल्या वादावरही योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “वक्फच्या नावाखाली कधी कल्याणकारी कामे केली आहेत का? तुम्ही त्यांचं एकही काम सांगू शकत नाही. वक्फ ज्या जमिनीकडे बोट दाखवून म्हणेल की ही आमची जमीन आहे ती त्यांना द्यायची? आपण त्यांच्या गोष्टी मान्य करायच्या? गेल्या कित्येक वर्षांपासून तेच घडतंय. आम्ही हे सगळं पाहून हैरान आहोत. हा कुठला आदेश आहे. जेपीसीने वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत काही शिफारसी केल्या आहेत आणि ही आजची सर्वात मोठी गरज आहे. सर्वांनी त्यावर विचार करणं आवश्यक आहे. या देशात मुस्लिमांच्या हितांचं रक्षण केलं जाईल आणि ते इथे सुरक्षित आहेत.” (CM Yogi Adityanath)
हेही वाचा- Donald Trump यांनी मतदानाचे नियम बदलले ; मतदार नोंदणीसाठी आता ‘हा’ पुरावा द्यावा लागणार
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की राज्यातील डबल इंजिन सरकार डगमगतंय. दोन्ही इंजिन एकमेकांना नमस्कार देखील करत नाहीत. त्यावर योगी म्हणाले, “आम्ही आमच्या नेतृत्वाचा सन्मान करतो. आम्ही आमच्या पूर्वजांचा आदर राखतो. परंतु, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे त्यांचं आचरण तसंच असेल.” (CM Yogi Adityanath)
औरंगजेब हा समाजवादी पार्टीचा आदर्श असल्याची टिप्पणी करत योगी आदित्यनाथ म्हणाले, “महाराणा प्रताप , छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह यांच्याबद्दल हे लोक (सपा) आम्हाला शिकवणार का? यांना इतिहासाची किती जाण आहे? हे सपावाले लोक औरंगजेब आणि बाबरची पूजा करतात, मोहम्मद अली जिन्नाह यांना आदर्श मानतात.” (CM Yogi Adityanath)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community