शेवटी सत्याचा विजय झाला; मोदींवर आरोप करणा-यांनी माफी मागावी- अमित शहा

87

गुजरात दंगलीशी संबंधित जाकिया जाफरी केस प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांनी शनिवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, गेल्या 19 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगली प्रकरणात अनेक खोटेनाटे अरोप करण्यात आले. मात्र त्यांनी या आरोपांना कधीही प्रत्युतर दिले नाही, ते 19 वर्षे भगवान शंकराप्रमाणे हे सर्व टीकेचे विष पचवत राहिले. सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लिन चिटमुळे पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते. ते पुसले गेले आहेत, असे अमित शहा म्हणाले.

मोदींवर अनेक आरोप झाले

गुजरात दंगली प्रकरणात पंतप्रधान मोदी यांची चौकशी झाली, मलाही अटक झाली. त्यानंतरदेखील मोदींवर राजकीय आयडिओलाॅजी घेऊन आलेल्या पत्रकारांनी, एनजीओंनी आणि विरोधकांनी आरोप सुरुच ठेवले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी हे टीकेचे विष पचवले. आज 19 वर्षांनंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चिट मिळाली आहे. मला याचे वाईट वाटते की सत्याची बाजू असताना देखील त्यांना खोट्या आरोपांचा सामना करावा लागला. मात्र ते या प्रकरणात एकही शब्द बोलले नाहीत.

खोटे आरोप करणा-यांनी माफी मागावी

दरम्यान, या प्रकरणात ज्यांनी नरेंद्र मोदींवर खोटे आरोप केले त्यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील अमित शहा यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, हा निर्ण. अपेक्षित होता. 19 वर्षांनंतर सत्याचा विजय झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.