‘भाजपानेही काँग्रेसप्रमाणे चुका केल्या तर…’ Nitin Gadkari यांचा आपल्याच पक्षाला इशारा की संदेश?

144
‘भाजपानेही काँग्रेसप्रमाणे चुका केल्या तर…’ Nitin Gadkari यांचा आपल्याच पक्षाला इशारा की संदेश?
‘भाजपानेही काँग्रेसप्रमाणे चुका केल्या तर…’ Nitin Gadkari यांचा आपल्याच पक्षाला इशारा की संदेश?

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) हा वेगळ्या प्रकारचा पक्ष राहिला असून त्यामुळेच मतदारांचा विश्वास वारंवार जिंकला आहे, असे मत भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. गोव्यातील तळेगाव येथे भाजपाच्या गोवा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत (BJP Goa Region Executive Meeting) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद वाई नाईक यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.  (Nitin Gadkari)

यानंतर आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भूतकाळात काँग्रेसने (Congress) केलेल्या चुका पुन्हा करू नका, असा इशारा दिला. त्या चुकांमुळेच काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, “काँग्रेस जे करत होती तेच आम्ही करत राहिलो, तर त्यांच्या बाहेर पडण्यात आणि सत्तेत येण्यात काही अर्थ उरणार नाही.” (Nitin Gadkari)

(हेही  वाचा – Thane Crime: ठाण्यात घडला गंभीर प्रकार! चिखलाचे पाणी उडाले म्हणून, चालकावर केला चाकूने वार)

पणजीजवळ गोवा भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे (Sadananda Tanawade) आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात त्यांचे राजकीय गुरू आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख केला ते म्हणाले, “आम्ही वेगळा पक्ष आहोत, असे अडवाणीजी म्हणायचे. आम्ही इतर पक्षांपेक्षा किती वेगळे आहोत हे समजून घेतले पाहिजे.” (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Gold Earrings Designs For Daily Use : मुलींना रोजच्या वापरासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्स)

काँग्रेसच्या चुकांमुळेच लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिल्याचे खासदार गडकरी म्हणाले. त्यामुळे अशाच चुका करण्याबाबत आपल्या पक्षाला नेहमीच सावध राहावे लागणार आहे. ते म्हणाले, “आपणही अशाच चुका केल्या, तर त्यांच्या बाहेर पडण्यात आणि आपल्या प्रवेशाला काही अर्थ नाही. त्यामुळे आगामी काळात राजकारण हे देशातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणेचे एक साधन आहे, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे. ” भ्रष्टाचारमुक्त देश करायचा असेल, तर त्यासाठी ठोस योजना आखली पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी नमूद केले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.