तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; संजय राऊतांची होणार चौकशी

87

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून रविवारी संजय राऊत यांचा लेख रोखठोक या सदरात प्रकाशीत झाला. मात्र सध्या संजय राऊत हे पत्राचाळ प्रकारणात ईडी कोठडीत आहेत. मग कोठडीत असताना, त्यांनी लेख लिहिला कसा असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणात खुलासा करताना ईडी अधिका-यांनी सांगितले की, असे करणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येईल. लेख लिहायचा असल्यास, न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता असते. जोपर्यंत न्यायालयाची विशेष परवानगी मिळत नाही, तोपर्यंत असा लेख लिहिता येत नाही. त्यामुळे आता राऊतांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

( हेही वाचा: अबू आझमींना महाराष्ट्राबाहेर फेकून द्या – छत्रपती संभाजीराजे )

काय म्हटलंय रोखठोकमध्ये ?

मुंबईमधून जर राजस्थानी आणि गुजराती समाज गेला तर मुंबई आणि महाराष्ट्रात पैसा शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. संजय राऊत यांनी देखील आपल्या रोखठोक या सदरातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ईडी त्यांच्यावर कारवाई करते ईडीच्या कारवाईचा फास त्यांच्याभोवती आवळला जातो, यावर देखील राज्यपालांनी काहीतरी बोलायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.