‘लोकशाहीत बहुमताला महत्त्व’; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

252

जून २०२२ पासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरणबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आठ महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. आता याप्रकरणावर येत्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. यावेळी हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही? यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमताला मोठं महत्त्व आहे आणि आपलं सरकार बहुमताचं आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही.

नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. न्याय व्यवस्थेने मॅरिटवर निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. आपलं जे सरकार स्थापन झालं आहे, ते बहुमताचं सरकार आहे, कायद्याद्वारे स्थापित झालेलं सरकार आहे. सगळे नियम पाळून हे सरकार स्थापन झालेलं आहे. आणि लोकशाहीत घटना आहे, कायदा आहे, नियम आहे. त्यामुळे लोकशाहीत बहुमताला मोठं महत्त्व आहे. यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून बहुमताच सरकार या राज्यात काम करतंय. या राज्याला सर्वांगीण विकास करण्याचं काम आमचं सरकार करतंय. दरम्यान हा मॅरिटवर निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. ज्यांना आता खात्री झाली असेल की, आपल्याकडे काहीच नाहीये. बहुमत तर आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना हा जो विषय आहे, हा प्रलंबित ठेवण्याची त्यांची अपेक्षा असू शकते. हा जेवढा टाळता येईल तेवढा टाळला जावा. कारण मोठं खंडपीठ स्थापन करायला वेळ लागतो.’

(हेही वाचा – महाराष्ट्र सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला; मोठ्या खंडपीठासंदर्भातील निर्णय होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.