Kolkata Rape Case प्रकरणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकील कपिल सिब्बलांना खडसावले; म्हणाले, ही एवढी गंभीर बाब आहे, कोणी इतके गाफील कसे असू शकते?

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

171

मंगळवारी, 20 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर (Kolkata Rape Case) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आरजी कार मेडिकल कॉलेजवरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. 15 ऑगस्टच्या रात्री आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत आंदोलन सुरू होते, त्याचवेळी सुमारे सात हजार लोकांनी येथे हल्ला केला. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले. एवढा मोठा विरोध सुरू असताना ममता सरकार इतके गाफील कसे असू शकते, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला. तसेच पश्चिम बंगाल सरकारच्या सरकारची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनाही खडसावले.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ममता बॅनर्जी सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. हॉस्पिटलबाहेर दीडशे पोलिस हजर होते, पण सात हजारांहून अधिक लोकांनी हल्ला केला तेव्हा आणखी फौजफाट्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत अधिक सैन्य आले तोपर्यंत घटना घडली होती. (Kolkata Rape Case)

(हेही वाचा न्यायदंडाधिकाऱ्याकडून हुंडा बळी प्रकरणाच्या सुनावणीस दिरंगाई; Bombay High Court ने फटकारले; म्हणाले, हे प्रकरण गंभीर वाटले नाही का? )

काय म्हणाले सरन्यायाधीश चंद्रचूड? 

बार आणि खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादावर, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘सिब्बल, ही एक अतिशय गंभीर बाब आहे… 37 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची ओळख पटली आहे. पश्चिम बंगाल सरकार इतके गाफील कसे असू शकते, त्यांना हे कळले नाही का की एवढा मोठा विरोध होत असताना आणखी एक विभागही असेल, जो येऊन ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करेल. महिला डॉक्टरांशी हुज्जत घातल्याने पोलिसांची तेथून पळापळ झाली. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला डॉक्टरांना नावाने हाक मारली जाते आणि प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांप्रमाणेच त्यांचेही हाल होतील, अशी धमकी दिली जाते. तेव्हा तिथे पोलीस काय करत होते?

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, जमावाने पुरुष आणि महिला डॉक्टरांवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. ते म्हणाले की, महिला डॉक्टरांच्या वतीने वकील अपराजिता सिंह यांनी ईमेलचा संदर्भ देऊन संपूर्ण घटना सांगितली आहे. हा ईमेल आरजी मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी 19 ऑगस्ट रोजी पाठवला होता. 700 डॉक्टर तिथे राहतात, पण आता फक्त 100 उरले आहेत कारण बाकीच्यांनी घटनेमुळे ते ठिकाण सोडले आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याच्या सूचना सरकारला दिल्या आहेत. (Kolkata Rape Case)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.