‘मविआ’ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, ‘शिंदे गटा’च्या 10 खासदार, 41 आमदारांना Y+ सुरक्षा

127

गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी सुरक्षेत कपात केली तर काहींची सुरक्षा काढून देखील घेतली. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सरकारने शिंदे गटाला सुरक्षा कवच प्रदान केले आहे. शिंदे गटाचे 10 खासदार आणि 41 आमदारांना राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडीत दाखल, सर्व कार्यक्रम रद्द)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाच्या शाखेवर, आमदारांवर आणि त्यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सर्व आमदारांना सीआरपी जवानांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आता ही सुरक्षा कमी करण्यात आल्याने या आमदारांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप राज्यातील परिस्थिती पाहता या आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

कोणत्या नेत्यांची सुरक्षा केली रद्द

सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, विजय वडे्टीवार, भास्कर जाधव, अनिल परब आणि नरहरी झिरवळ या प्रमुख नेत्यांची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

या नेत्यांची सुरक्षा कायम

मिलिंद नार्वेकर, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, विश्वजीत कदम, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि के सी पाडवी या प्रमुख नेत्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.