भारत कधी होणार आर्थिक महासत्ता?

154
येत्या आठ वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता, महासत्ता  होईल. तर अजून 25 वर्षांनी जागतिक अर्थव्यवस्था होण्यापासून देशाला कोणीही रोखू शकणार नाही. हा दावा जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी केला आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारत तयार 

भारत 2030 साली जगातील तिसरी अर्थसत्ता होईल. तर 2050 मध्ये भारत जगातील दुसरी अर्थव्यवस्था असेल, असा दावा अदानी समूहाचे संचालक गौतम अदानी यांनी हा केला आहे. मुंबई येथे आयोजित वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटेंट्स 2022 मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते. गौतम अदानी यांच्या दाव्यानुसार, येत्या तीन दशकांमध्ये भारत उद्योजकता कार्यक्रमात गतीने पुढे जाईल. भारताने 2021 मध्ये जागतिक स्तरावर रिअल टाईम ट्रॅन्झॅक्शनमध्ये इतिहास रचला. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनीच्या एकूण व्यवहारांपेक्षा हा आकडा 6 पट जास्त आहे. या सर्व देशांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये मानव आणि मशीन यांच्यात सुसंवाद राहील. भारत ग्रीन पॉवर क्षेत्रात गतीने पुढे जात आहे. सौर ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन या भविष्यातील मोठ्या संधी आहेत. ऊर्जेचा पूनर्वापर करण्यासाठी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसीत होत असल्याचे अदानी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.