Islam : सावधान! इस्लाम राष्ट्रनिर्मिती आकार घेत आहे !

नास्तिक किंवा अनेकेश्वरवादी किंवा मूर्तिपूजक एकमेव अल्लाला न मानताही या मानवी मूल्यांवर एखादी व्यक्ती विश्वास ठेवू शकते, त्या मूल्यांचे आचरण करू शकते, ही भूमिका कुराणाला मान्य नाही.

121
  • दुर्गेश जयवंत परुळकर

स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेली मोहीम संपूर्ण महाराष्ट्रातही राबवली जात आहे. कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक असे या मोहिमेचे नाव आहे. ही मोहीम शाळा आणि महाविद्यालयांमधून शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ पासून राबवण्यास आरंभ झाला असून ती शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४ या दिवसापर्यंत चालवली जाणार आहे. म्हणजेच पंधरा दिवसांची ही मोहीम आहे. या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, डॉक्टर, विचारवंत इत्यादी अनेकांचा सहभाग असणार आहे. कुराणाचे आणि इस्लामचे महत्व सांगण्यात येणार असून त्याचा स्वीकार करण्याचे आवाहनही केले जाईल. हे आवाहन शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असणार नाही ते सर्वसामान्य जनतेला ही यात सहभागी करून घेणार आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या मोहिमेच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून हिंदू आणि इस्लाम (Islam) धर्मातील अंतर सांगणे नितांत आवश्यक आहे.

इस्लामची शिकवण

जगात इस्लाम धर्मावाचून अन्य कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. कुराणातील मार्गदर्शनाप्रमाणे जो जीवन जगतो तोच खरा अल्लाचा एकनिष्ठ भक्त आहे. अनेकेश्वरवादी हे अल्लाचे शत्रू आहेत. हे संपूर्ण जग इस्लाम धर्मियांचे असून केवळ इस्लाम धर्म या जगात टिकून राहिला पाहिजे आणि सगळे जग इस्लाममय करायचे आहे. म्हणजेच पृथ्वीवर अल्लाचे राज्य स्थापन करणे हे इस्लामचे ध्येय आहे. जगातल्या सर्व धर्मापेक्षा इस्लाम धर्मच श्रेष्ठ धर्म आहे. असे कुराणाचे मत आहे. इस्लाम (Islam) धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माचे अनुयायी कुराणाच्या मते श्रद्धाहीन आहेत. अशा श्रद्धाहीनांच्या हृदयात थरकाप निर्माण करणे हे इस्लामच्या प्रत्येक अनुयायाचे कर्तव्य ठरते. एकदा का इस्लाम धर्माचा स्वीकार केला की केवळ अल्लाचा स्वीकार करावा लागतो इतर देवदेवतांचा स्वीकार करणे, हा कुराणाच्या दृष्टीने अपराध ठरतो.

कुराणनुसार अल्लावरच श्रद्धा असलेल्या लोकांना स्वर्गप्राप्ती होते

मूर्तिपूजकांना क्षमा करा अशी प्रार्थना इस्लामच्या कोणत्याही अनुयायाला करता येत नाही. ते मूर्तिपूजक इस्लाम धर्माच्या अनुयायांचे नातलग असले तरी त्यांच्याविषयी प्रार्थना करता येत नाही. कारण इस्लामवर ज्याची श्रद्धा नाही तो श्रद्धाहीन असून त्याचे स्थान नरकात आहे. केवळ अल्लावरच श्रद्धा असलेल्या लोकांना स्वर्गप्राप्ती होते इतरांना स्वर्गप्राप्ती होत नाही असे कुराणाचे मत आहे. अल्ला वाचून इतर देवदेवतांवर श्रद्धा ठेवणाऱ्याचा इस्लाम (Islam) धर्माला स्वीकार करता येत नाही. कारण तसा अल्लाचा नियमच आहे. असे कुराणाचे मत आहे म्हणून श्रद्धाहीनांना नष्ट केले जावे, असे कुराण सांगते. इस्लाम धर्माच्या दृष्टीने मूर्तिपूजक अनेक देवदेवतांना मानणारे म्हणजे हिंदू आणि इतर धर्मग्रंथांना मानणारे लोक श्रद्धाहीन असून ते निकृष्ट प्राण्यांमध्ये मोडतात. जे मूर्ती पूजा करतात ते कनिष्ठ दर्जाचे आहेत. अगदी मार्ग भ्रष्ट झालेले आहेत, असे कुराण सांगते.

कुराणातील आज्ञेप्रमाणेच प्रत्येकाला वर्तन करावे लागते

नास्तिक किंवा अनेकेश्वरवादी किंवा मूर्तिपूजक एकमेव अल्लाला न मानताही या मानवी मूल्यांवर एखादी व्यक्ती विश्वास ठेवू शकते, त्या मूल्यांचे आचरण करू शकते, ही भूमिका कुराणाला मान्य नाही. मानवी मूल्यांना मानण्यासाठी किंवा त्याचे आचरण करण्यासाठी जी पात्रता किंवा गुणवत्ता मनुष्याच्या अंगी असावी लागते त्यासाठी पूर्व अट म्हणून अगोदर श्रद्धावान असणे कुराणाच्या दृष्टीने अनिवार्य आहे. याचा अर्थ इस्लामचा स्वीकार केल्यानंतरच सद्गुणी वगैरे बनण्याची पात्रता माणसाच्या अंगी येते, तो सदाचारणी वगैरे बनण्याची शक्यता निर्माण होते. अशी कुराणाची भूमिका आहे. एकदा का इस्लामचा स्वीकार केला की कुराणातील आज्ञेप्रमाणेच प्रत्येकाला वर्तन करावे लागते. त्या बाहेर जाऊन स्वतंत्रपणे कोणतेही कार्य किंवा वर्तन करता येत नाही. संपूर्ण जगाचे इस्लामिक जगतात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे यालाच जिहाद असे म्हणतात. कुराणाच्या भाषेत दारुलहरबचे म्हणजे इस्लामेतर राष्ट्राचे, दारुल इस्लाम मध्ये म्हणजे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करणे याला जिहाद असे म्हणतात. स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेने आयोजित केलेली ही मोहीम म्हणजे हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी आरंभलेला जिहाद आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म हिंदू संस्कृतीची शिकवण जाणून घेणे नितांत आवश्यक आहे.

मुसलमानांचा धर्म हा अन्य धर्मीयांच्या देवदेवतांना, श्रद्धा स्थानांना मानत नाही. त्याच्या दृष्टीने अन्य धर्मियांच्या अनुयायांना इस्लाम (Islam) धर्माची दीक्षा देऊन त्यांचा धर्म नष्ट करणे, इस्लाम धर्माची शिकवण देणे हीच इस्लाम वरची परमोच्चनिष्ठा आहे. त्यासाठी कत्तल करणे, बलात्कार करणे, अन्य धर्मियांची संपत्ती लुटणे, त्यांना परागंदा करणे, त्यांची श्रद्धास्थाने नष्ट करणे, मंदिरे नष्ट करणे, मूर्तीभंजन करणे, जाळपोळ करणे, या आणि अशा प्रकारच्या राक्षसी प्रवृत्तीची जोपासना करणे इस्लामच्या दृष्टीने पवित्र कार्य आहे. असे असूनही स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेला वाटते की इस्लामची ही शिकवण मानवतेची खरी शिकवण आहे. हीच खरी अध्यात्मिक शिकवण आहे.

इस्लाम धर्माची अशा प्रकारची राक्षसी वृत्तीची शिकवण हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने अधार्मिकता आहे, अनैतिक आहे आणि अन्यायकारक आहे. कारण अशा प्रवृत्तीला हिंदुधर्माने पाशवी, राक्षसी वृत्ती म्हणून धिक्कारले आहे. असे असूनही हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म सारख्या प्रकारची शिकवण देणारे धर्म आहेत असे बेलाशक विधान केले जाते, ते सर्वस्वी दिशाभूल करणारे आहे.

इन्द्रं वर्धंत: अप्तुर: कृण्वन्त: विश्वं आर्यं अपघ्नत: अराव्ण: ॥
( ऋग्वेद , मंडल ९, सुक्त ६३.५)
आशय- इंद्राचा सन्मान वाढवणारा, जलासमवेतच वास करणारा आणि विश्वाला आर्य म्हणजे ज्ञानी करणारा, कंजुष असलेल्या व्यक्तींना दानी करणारा असा हा सोम कीर्तिमान होवो.

सत्कार्य अत्यंत कौशल्यपणे करणारे जे कर्मयोगी आहेत त्यांना पूर्ण वाव दिला पाहिजे. माणसाने आपल्यातील दुर्गुणांचा नाश केला पाहिजे. आपण स्वतः सज्जनतेने वागावे. आपण आपल्या हिताचा जसा विचार करतो तसाच इतरांच्या हिताचा विचार करावा. अशा प्रकारे स्वतःमधील दुर्गुण दूर करून सदगुणांची वाढ करणारा सुसंस्कृत, सुविद्य म्हणून ओळखला जातो. त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीने आर्य हे विशेषण वापरले आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील

जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥

या दोन ओळींना समोर ठेवूनच कदाचित आर्य या शब्दाची अधिक व्यापक अशी व्याख्या आर्य समाजाने केली आहे. ती अशी…..

“जी व्यक्ती केवळ प्रशंसनीय कार्य करते, इतरांना सन्मानाने वागवते आणि जपते, मानवी समाजाला घातक ठरणाऱ्या सवयींचा आणि कार्यांचा स्वीकार करत नाही. किंबहुना अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते. तसेच जी व्यक्ती स्वभावाने दयाळू आहे तिला आर्य म्हणतात.”

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही ज्यावेळी जन्मास येते त्यावेळी अत्यंत सामान्य असते. तिच्यावर कोणतेही संस्कार झालेले नसतात. अशा नवजात बालकावर संस्कार करून त्याला सुविद्य करणे हे कार्य धर्माचे आणि संस्कृतीचे आहे. गुणसंवर्धन आणि दुर्गुणांचा ऱ्हास करणे हेच संस्काराचे मूळ सूत्र आहे. त्याला अनुरूप अशीच शिकवण हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती देते.

(हेही वाचा महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आणखी भरघोस निधीची तरतुद करणार: Devendra Fadnavis)

हिंदू धर्माने केवळ आपलाच देव श्रेष्ठ असे मानले नाही. कोणत्याही देवाची उपासना माणसाने करावी असे स्वातंत्र्य प्रत्येकाला हिंदू धर्माने, हिंदू संस्कृतीने दिले आहे. सगुण आणि निर्गुण उपासना अशा दोन पद्धतींचा स्वीकारही बौद्धिक, वैचारिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर हिंदू संस्कृतीने केला आहे. हिंदू संस्कृतीची ही व्यापकता आणि सर्व समावेशकता आपण लक्षात घेतली पाहिजे.

कोणत्याही गोष्टीचा आग्रह हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृती करत नाही. वाईट गोष्टींचा त्याग करावा आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा अशी अपेक्षा मात्र ठेवण्यात आली आहे. अन्याय,अनैतिकता, अधर्म आणि परपीडा देणे याला पाप म्हणून हिंदू संस्कृतीने धिक्कारले आहे.

महर्षी वेद व्यास यांनी पाप आणि पुण्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
परोपकाराय पुण्याय ।
पापाय परपीडनम् ॥

संत तुकाराम महाराजांनी यावरील श्लोकाचा अत्यंत सोप्या भाषेत अनुवाद आपल्या अभंगात करताना लिहिले…

पुण्य पर उपकार ।
पाप ते पर पीडा ॥

दुसऱ्याचे कल्याण करणे हे पुण्यमय काम आहे, तर दुसऱ्यांना दुःख देणे, त्रास देणे हे पाप मानले आहे.

म्हणजेच हिंदू संस्कृतीत, हिंदू धर्मात क्रूरतेला कोठेही स्थान नाही.

सर्वे भवन्तु सुखिन : ।
सर्वे सन्तु निरामय : ॥

सर्वांना सुख लाभावे आणि सर्वांना आरोग्यमय जीवन लाभावे अशी प्रार्थना वरील श्लोकाद्वारे करण्यात आली आहे.

इस्लाम धर्मात अशा प्रकारची प्रार्थना आढळून येत नाही अथवा अशा प्रकारचे शिक्षण इस्लाम धर्मात दिले जात नाही. म्हणूनच अन्नपदार्थांमध्ये थुकणे हा त्यांचा धर्म आहे. असे कृत्य करताना समाजातील इतर लोकांचा विचार केला जात नाही. त्यांच्या आरोग्याची दक्षता घेतली जात नाही. असे असूनही शांततेची शिकवण देणारा, मानवतेची शिकवण देणारा धर्म म्हणून इस्लाम धर्माचे गोडवे गायले जातात ही निव्वळ धुळफेक आहे.

चार्वाकाने वेदांचा धिक्कार ओंकारेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून केला आहे. म्हणून कोणत्याही हिंदू धर्माच्या अनुयायाने त्याचा शिरच्छेद केला नाही. इस्लामची शिकवण नाकारणाऱ्याला मात्र देहदंडाचे शासन देण्यात येते.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतामृत पाजले पण अखेरीस त्यांनी अर्जुनाला सांगितले…

इति ते ज्ञानमाख्यातं,
गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण,
यथेच्छसि तथा कुरु ॥
(श्रीमद्भगीता अध्याय, १८ श्लोक ६३)
आशय- अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसेच कर.

असा अर्थ व्यक्त करणारा किंवा असा विचार मांडणारा एकही शब्द आपल्याला कुराणात आढळत नाही.

प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे नैसर्गिक सत्य असूनही त्याला इस्लाम धर्म मान्यता देत नाही. किंवा त्याचा स्वीकार इस्लामने केला नाही.

हिंदू धर्माने, हिंदू संस्कृतीने ज्ञान, सत्य, न्याय, नैतिकता या आणि अशा उत्तमोत्तम तत्त्वांचा अंगीकार केला आहे. ज्ञानाकडे, सत्याकडे, न्यायाकडे आणि नैतिकतेकडे पाठ फिरवणे म्हणजे प्रकाशाकडून अंधाराकडे सुरू झालेला प्रवास आहे. असा उलटा प्रवास हिंदू संस्कृतीला मान्य नाही. म्हणून बृहदारण्यक उपनिषदाने ईश्वराकडे प्रार्थना केली आहे…

असतो मा सत्गमय ।
तमोसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतंगमय ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:
आशय – आम्हाला असत्याकडून सत्याकडे, अंधाररुपी अज्ञानाकडून प्रकाशरुपी ज्ञानाकडे आणि मृत्यूकडून अमृताकडे म्हणजेच अशाश्वततेकडून शाश्वततेकडे घेऊन जा. अशी प्रार्थना केली आहे. त्यानंतर त्रिवार शांतीची मागणी केली आहे. मानवी जीवन हे आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तीन स्तरांवरचे आहे. या तिन्ही स्तरावरचे जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारची अशांतता आमच्यात निर्माण होऊ नये अशी प्रार्थना वरील श्लोकाद्वारे करण्यात आली आहे.

इस्लाम धर्माची शिकवण देण्याची व्यवस्था सोलापूर येथील स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेने आयोजित केलेल्या मोहिमेत अंतर्भूत केली आहे. या शिकवणुकीत मुख्य मुद्दा कोणता याचा आपण तर्क करू शकतो.

महंमद इकबाल यांनी सारे जहाँ से अच्छा हे गीत लिहिले ते वर्ष होते १९०४ ! त्यावेळी या गीतात

मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना ।
हिंदी है हम वतन है हिंदुस्ताँ हमारा ॥
अशा ओळी रचल्या होत्या पण नंतर वर्ष १९१० मध्ये सारे जहाँ से अच्छा या कवितेतील वर उल्लेखलेल्या ओळी काढून टाकण्यात आल्या आणि त्या जागी पुढील दोन ओळींचा समावेश करण्यात आला.

चीनो अरब हमारा हिंदुस्ताँ हमारा।
मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा ॥

या वरील सर्व विवेचनावरून
मुसलमान आणि हिंदू या दोन धर्मग्रंथातील तुलनात्मक मार्गदर्शन आपल्याला कोणता धर्म स्वीकारावा आणि कोणता धर्म स्वीकारू नये याचे मार्गदर्शन करण्यास पर्याप्त आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.