Sharad Pawar यांचे ‘एक तीर तीन निशाने’? UBT चाच थयथयाट!

53
Sharad Pawar यांचे 'एक तीर तीन निशाने'? UBT चाच थयथयाट!
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात कौतुक केले. याचे पडसाद महाराष्ट्रात दुसऱ्याच दिवशी सकाळी उमटले. मात्र पवार यांनी ‘एक तीर तीन निशाने’ असा गेम केल्याचे बोलले जात आहे तर उबाठाने हे तीनही तीर स्वतःवर घेऊन थयथयाट सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

प्रचंड अस्वस्थता

मंगळवारी ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने गेल्याचं पवार (Sharad Pawar)  म्हणाले. त्यामुळे शिवसेना उबाठामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

निशाण्यावर त्यांचे पुतणे

शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे यांचे कौतुक केले. यामागे पवार यांचे काही गणित आहे असा कयास राजकीय क्षेत्रात लावला जात आहे. महाविकास आघाडीचा भाग असताना महायुतीमधील प्रमुख घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांची स्तुति केली आणि त्यांच्या निशाण्यावर त्यांचे पुतणे अजित पवार, भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उबाठा होते.

(हेही वाचा – France AI Summit : फ्रान्समधील Al समिट दरम्यान सुंदर पिचाई यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट)

लोकांना कळण्याआधीच उबाठाचा थयथयाट

अपरिपक्व राजकारणाचे दर्शन बुधवारी शिवसेना उबाठाकडून करण्यात आले, अशा भावना शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांमध्येही व्यक्त होत आहेत. शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय? हे लोकांना कळण्याआधीच शिवसेना उबाठाने थयथयाट सुरू केल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

पवार (Sharad Pawar) यांच्या निशाण्यावर अजित पवार आणि फडणवीस हेदेखील होते. मात्र त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्या नाहीत. तसेच उबाठाच्या थयथयाटात अजित पवार आणि फडणवीस यांच्याकडे जाणकारांचेही लक्ष गेले नाही आणि सगळा वाद शरद पवार आणि उबाठा यांच्यात सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

पवार काय म्हणाले?

“नागरी प्रश्नांची, समस्यांची जाण असलेला नेता कोण, याची माहिती घेतली तर त्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव घ्यावं लागेल. ठाणे, ठाणे महानगरपालिका, मुंबई येथील समस्यांची त्यांना जाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनाही जाण आहे. योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून प्रश्नाचा तोडगा काढण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद महाराष्ट्राच्या राजनीतीच्या इतिहास राहील. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान होतोय, याचा मला आनंद आहे”, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

(हेही वाचा – स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही)

शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशीरा आले!

संजय राऊत म्हणाले, “कदाचित शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षांत शिवसेनेने केलं. ठाण्याचा विकास सतीश प्रधान यांनी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले. शरद पवारांना माहिती हवी असेल तर आमचे राजन विचारे त्यांना माहिती पुरवतील. आम्ही त्यांना सर्व फाईल्स घेऊन पाठवू. एकनाथ शिंदे फार उशिरा आमदार झाले अन् विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली,” अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.

पवारांनी जायला नको होते

यावर शिवसेना उबाठाचे मुखपत्र दैनिक ‘सामना’त अग्रलेख लिहून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. राऊत यांनी तर पवार यांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होते, असे सांगून शरद पवार यांनीही उबाठाचे धोरण अवलंबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. बुधवारी १२ फेब्रुवारी २०२५ ला सकाळीच शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उसने अवसान आणत, ठाण्यावर शिवसेनेचे कसे प्राबल्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि राजन विचारे यांच्याकडे बोट दाखवले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.