आसाममध्ये Muslim विकत असलेल्या मासळीमुळे वाढतात किडनीचे आजार; मुख्यमंत्री सरमा यांनी दिली धक्कादायक माहिती

मुख्यमंत्री सरमा यांनी X वर पोस्ट करून म्हटले की, आसाममधील काही लोक (Muslim) जाणूनबुजून युरियाने भरलेले मासे जनतेला वितरित करत आहेत. जनतेने सतर्क राहावे, सरकारही कारवाई करत आहे.

196

गेल्या चार वर्षांत नागाव आणि मोरीगावमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या मुसलमानांमुळे लोकांमध्ये किडनीचे आजार वाढत आहेत. कारण या दोन्ही जिल्ह्यांतील मासळी उत्पादक मुसलमान (Muslim) मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर करतात. नागाव आणि मोरीगाव येथील मासेमारी उद्योगात स्थलांतरित मुस्लिमांचे वर्चस्व आहे. अशा लोकांकडून मासे घेणे धोकादायक ठरू शकते, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

मुख्यमंत्री सरमा यांनी X वर पोस्ट करून म्हटले की, आसाममधील काही लोक (Muslim) जाणूनबुजून युरियाने भरलेले मासे जनतेला वितरित करत आहेत. जनतेने सतर्क राहावे, सरकारही कारवाई करत आहे. अशा लोकांकडून मासे खरेदी करू नका जे व्यवसाय वाढवण्यासाठी शॉर्टकट घेतात. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय मार्ग आहेत. मत्स्योत्पादनासाठी शॉर्टकटचा अवलंब करत राहिल्यास. त्यामुळे हे चालणार नाही.

(हेही वाचा पनवेलमध्ये CIDCOचा भोंगळ कारभार; पूल अर्धवट बांधून ठेवला; नागरिकांची गैरसोय सुरूच)

काही दिवसांपूर्वी आसाममधील नागाव येथे एका विशिष्ट समुदायाच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. सीएम सरमा यांनीही त्यावेळी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, आजकाल या लोकांची हिंमत खूप वाढली आहे. लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.