ठाकरे सरकार दहशतवाद्यांचे स्मारक उभारण्यात व्यस्त होते, सोमय्यांचा हल्लाबोल

91

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असलेला दहशतवादी याकूब मेमनला 2015 साली फाशी देण्यात आली. या घटनेला 7 वर्ष झाल्यानंतर आता याकूबच्या कबरीवरुन वाद उफाळून आला आहे. दहशतवादी याकूबची कबर सुशोभित करण्यात आल्यामुळे भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालीन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकार दहशतवाद्यांचे स्मारक उभारण्यात व्यस्त होते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

याकूबच्या कबरीचे सुशोभिकरण

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील पीडित इश्वर साकरे आणि नरेश सराफ यांना सोबत घेऊन किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले,अनेकजण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर मुंबईतील बडा कब्रस्तान इथे त्याची कबर बनवण्यात आली व या कबरीचे सुशोभिकरण देखील करण्यात आले.

(हेही वाचाः दहशतवादी याकूबची कबर कोणी सजवली? महापालिका आयुक्त म्हणतात…)

सोमय्यांचा आरोप

गुरुवारी मुंबई पोलिसांनी या कबरीवरील सुशोभिकरणाविरोधात कारवाई करत येथील लाईट हटवले. पण एका दहशतवाद्याची कबर सुशोभित केलीच कोणी, असा सवाल आता भाजपकडून उपस्थित होत आहे. या बॉम्बस्फोटांना 30 वर्षे होत आली तरी आजही त्यातील पीडितांच्या वेदना ताज्या आहेत. ज्या याकूब मेमनला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली त्याच याकूब मेमनचं स्मारक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुंबई महापालिकेकडून करण्यात आला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांचे माफिया राज आम्ही संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.