पुन्हा एकदा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दौऱ्यात गैरहजर! आतापर्यंत किती वेळा पंतप्रधानांना टाळले?

92
राज्यात शिवसेनेने अचानक भाजपसोबत वैर घेऊन दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, तेव्हापासून एकेकाळचे दोन मित्र पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी बनले. मुख्यमंत्री पदी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. महाविकास आघाडीची सत्ता राज्य करू लागली, पण केंद्रात भाजपच्या सरकारसोबत जुळवून घेताना शिवसेनेला तितकेसे जमत नाही. त्यामुळे कोरोना काळातील अडीच वर्षांत केंद्र आणि राज्य यातील समन्वयाचा अभाव दिसत होता. आता हा संवाद इतका तुटला आहे की, राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदी यांना विचारातही नाहीत, त्यांच्या दौऱ्यात उपस्थित राहण्याचे टाळत आहेत. वास्तविक देश सर्व राज्यांचा एकसंध असतो, केंद्राच्या नेतृत्वाखालीच राज्ये प्रगती करत असतात, इथे मात्र आपापसातील हेवेदावे राज्याच्या प्रगतीसाठी धोंडा म्हणून उभी राहिली आहेत का, असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

कोविड बैठकीत गैरहजर!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात काहूर माजवले होते, मृत्यूचे आकांडतांडव सुरु होते. त्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अशा वेळी केंद्र आणि राज्यात समन्वय असणे नितांत गरजेचे होते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यावेळी शारीरिक आजाराचे कारण दिले, मात्र त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या लहानशा अॅपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.

विमानतळावर गेलेच नाही! 

पंतप्रधान एखाद्या राज्यात येतात, तेव्हा विमानतळावर संबंधित राज्याचा मुख्यमंत्री उपस्थित असतो, तसा राजशिष्टाचार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले, तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विमानतळावर जाणे टाळले.

मेट्रोच्या उदघाटनाला अनुपस्थित! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले, म्हणून ते कार्यक्रमाला गेले नाही, अशी चर्चा त्यावेळी सुरु झाली.

लता मंगेशकर पुरस्कार वितरणाला दांडी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ एप्रिल २०२२ रोजी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्या कार्यक्रमाला न जाता मुख्यमंत्री ठाकरे सह कुटूंब राणा दाम्पत्याला विरोध करणाऱ्या ९२ वर्षीय वृद्ध महिला शिवसैनिकाला भेटण्यासाठी परळ येथे गेले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.