महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या! राज ठाकरेंची मोदींकडे मागणी

कोरोनाची नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील, तर राज्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

88

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे.

या कोविड-१९च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. ‘आरोग्य’ हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल. या सर्व सूचनांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पहाल व प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा, नव्हे, खात्रीच आहे, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका)

काय म्हटले आहे राज ठाकरेंनी पत्रात?

  • गेल्या वर्षी कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील  पहिल्या काही रुग्णांपैकी काही रुग्ण महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील महाराष्ट्रात झाले आहेत. आज सारा देश कोविड-१९ च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात बिकट आहे.
  • कोविड-१९ ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही उमटलेले अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?

  • या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल, तर १०० टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे.
  • म्हणूनच, महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे.
  • हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच.
  • महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या.
  • राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
  • ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
  • लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
  • कोविड-१९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.