Lok Sabha Election Result : पुन्हा एकदा हिंदूंनीच केला हिंदूंचा घात!

मूर्ख समजल्या जाणार्‍या पप्पूला यासाठी 100 मार्क द्यायला हवेत. भाजपामुळे महागाई वाढली हा हातातोंडाशी गाठ असलेल्यांचा समज भाजपा दूर करू शकला नाही, अशा असंख्य गोष्टी आहेतच पण मुख्य म्हणजे हिंदूंना हिंदूहितच कळत नाही ही सत्य परिस्थिती आहे.

872
  • मंजिरी मराठे 

हिंदू समाजासारखा मूर्ख समाज नाही हे हिंदूंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. एक फतवा निघतो आणि त्यांची मतदानाची टक्केवारी वाढते पण आम्ही मात्र मतदानासाठी बाहेरच पडत नाही. काँग्रेस किंवा इंडी आघाडी म्हणजे मुस्लिमांची सत्ता हे आपल्याला कळत नसेल, विशेष करून बहुसंख्य बुद्धिवादी, उच्चशिक्षित तरुणांना कळत नसेल तर यासारखं दुर्दैव नाही. मोदी विरोध म्हणजे कॉंग्रेसचा फायदा म्हणजेच मुस्लीम तुष्टीकरण हे आपल्याला कळत नसेल तर तो आपला मूर्खपणा आहे.
महाराष्ट्रात अजित पवारांना बरोबर घेणे यासारख्या भाजपाच्या अनेक चुका त्यांना भोवणार असं बोललं जात होतंच. पण त्यासाठी भाजपाला मतदान न करणं म्हणजे कॉंग्रेसला साहाय्य हे आपल्याला कळत नसेल तर दोष आपला आहे. (Lok Sabha Election Result)

उबाठा ज्यांच्या बरोबर गेले त्यातला तोटा आपल्याला कळत नसेल तर दोष आपला आहे. सर्वसामान्य महिला वर्ग भुलला तो ‘खटाखट 1 लाख रुपयांना’ पण इतके पैसे देता येणं कुठल्याही सत्तेला शक्य नाही हे भाजपा त्यांना पटवून देऊ शकला नाही. मूर्ख समजल्या जाणार्‍या पप्पूला यासाठी 100 मार्क द्यायला हवेत. भाजपामुळे महागाई वाढली हा हातातोंडाशी गाठ असलेल्यांचा समज भाजपा दूर करू शकला नाही, अशा असंख्य गोष्टी आहेतच पण मुख्य म्हणजे हिंदूंना हिंदूहितच कळत नाही ही सत्य परिस्थिती आहे. (Lok Sabha Election Result)

(हेही वाचा Lok Sabha Election Result : मोदींविरोधात ‘फतव्या’चा परिणाम; मुसलमानांनी मुस्लिम उमेदवारांवर बहिष्कार टाकून ‘मविआ’च्या उमेदवारांना दिली मते )

एक फतवा निघाला आणि मोदींविरोधी मतदान झालं. पण हिंदूहित हे आपलं ‘ब्रह्मवाक्य’ ठरू शकत नाही याला कारण आपल्यातला जातीयवाद आणि तोच जातीयवाद आपल्याला या निवडणुकीतही घातक ठरला आहे. मुंबईत मराठी विरुद्ध गुजराथी या जातीयवादानं हरले हिंदूच. कारण निवडून आलेल्या हिंदूंनाही आणि त्यांना मतं देणार्‍या हिंदू मतदारांनाही हिंदूहिताशी काहीही देणंघेणं नाही. कुठे कुणबी विरुद्ध आग्री या जातीयवादानं हरला हिंदूच. ब्राह्मण ब्राह्मणेतर  हा वाद तर होताच पण विकोपाला जात असलेला जातीजातीतला विद्वेष कारणीभूत होत आहे आपल्याच, हिंदूच्याच र्‍हासाला. (Lok Sabha Election Result)

३७० कलम रद्द करणं, समान नागरी कायदा आणण्याचा विचार करणं, राममंदिराच्या वेळचे आनंद सोहळे, विदेशात भारताला मिळत असलेला मान, देशात होत असलेल्या सुधारणा, प्रगती याला काडीचंही महत्व नाही, उद्या देश विकायला काढला तरी ‘मला काय त्याचे’. आम्ही करणार जातीपातीचं राजकारण, भरणार स्वतःच्या तुंबड्या आणि देणार हिंदूहिताचा बळी. (Lok Sabha Election Result)

सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजकारणाचं हिंदूकरण’ झालं नाही तर हिंदूंना अस्तित्वच उरणार नाही. आत्ता जो जबरदस्त फटका बसला आहे त्यातून हिंदू जागा झाला तर ठीक, नाहीतर तो ‘खटाखट खटाखट’ संपणार आहे हे निश्चित.
हिंदूच उरला नाही की, जातीपातीचं राजकारण करणारे स्वतःही उरणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं. हिंदू नामशेष व्हायला नको असेल तर हिंदूंनो, हिंदूंच्याच अस्तित्वासाठी आतातरी जागे व्हा…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.