मनसे आंदोलनाचा इफेक्ट : ठाण्यात मशिदींवरील भोंगे उतरवले

160

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनाचा जोरदार परिणाम झाला आहे. विशेषतः यामुळे ठाण्यातील मुंब्रा आणि कापूरबावडी परिसरातील मशिदींवरील भोंगे मशिदीच्या मौलवींनी खाली उतरवले आहेत. हा मनसेच्या आंदोलनाचा इफेक्ट आहे, असे म्हटले जात आहे.

भोंगा विरोधी आंदोलनानंतर झाला परिणाम 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत पहिल्यांदा मशिदींवरील भोंगे खाली उतरावा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद येथील सभेतही राज ठाकरे यांनी पुन्हा हीच भूमिका घेत ४ मे रोजी ठिकठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बुधवार, ४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी भोंगे लावून हनुमान चालीसा लावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेचे भोंगे आंदोलन हे केवळ एक दिवसाचे नाही तर दररोज सुरु असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ठाण्यातील मुंब्रा आणि कापूरबावडी येथील मशिदींवरील भोंगे मशिदीच्याच मौलवींनी खाली उतरवले आहेत. हा मनसेच्या भोंगा आंदोलनाचा परिणाम आहे, असे मानले जात आहेत.

(हेही वाचा राज ठाकरे भूमिकेवर ठाम; जिथे अजान वाजणार तिथे हनुमान चालिसा लागणारच)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.