Maharashtra budget Session : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ ध्येय कोणती आहेत?

115

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीस कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरू होती. यानुसार आता उपमुख्यमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयांवर आधारित असणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : Maharashtra budget 2023-2024 : शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी)

अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित…

  • शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
  • महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • रोजगानिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • पर्यावरणपूरक विकास

अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात

तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरूवात करतो. भारताच्या स्वातंत्र्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला त्यांनी संविधानच नाही तर अर्थकारणावरही मार्गदर्शन केले त्यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे यंदा शताब्दी वर्ष आहे आणि माझे अर्थमंत्री म्हणून हे पहिलेच बजेट आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केली. आयपॅडमधून या अर्थसंकल्पाचे वाचन केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.