अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार नागपुरात! कारण काय…

83

राज्याचे हिवाळी अधिवेशन 2 दिवस राहिले आहेत. त्याआधी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आले होते. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान आज जाहीर करण्यात आले आहे.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध)

विरोधकांची विनंती आणि आग्रह

या आधी सुरू असलेले हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल, तर पुढील अधिवेशन मुंबईऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याने अधिवेशनाचा कालावधी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. संसदेचे अधिवेशन अधिक काळ चालू शकते तर राज्याचे अधिवेशन का चालत नाही?, असा सवाल विरोधकांनी केला होता. तर अनेक राज्यांचे अधिवेशन कमी कालावधीचा होता असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.