‘त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ…’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

92

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत असून, छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आणि देशाचे आदर्श आहेत याबाबत राज्यपालांच्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)

राज्यपालांच्या वक्तव्याचे अर्थ काढण्याचा प्रयत्न

जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे,देशाचे आणि आपल्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहतील, याबाबत कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण राज्यापालांच्या मनातही महाराजांबाबत कोणतेही चुकीचे भाव नाहीत, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः ‘मोदी माझे आवडते पंतप्रधान’, सुप्रिया सुळेंची जाहीर कबुली)

त्रिवेदी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह काही नाही

तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत टीका करण्यात येत असतानाच त्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुधांशू त्रिवेदी यांचं वक्तव्य मी नीट ऐकेलं आहे. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितल्याचे म्हटले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.