‘हा आक्षेप लवकरच दूर होईल’, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांचे मोठे विधान

66

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रीपद देण्यात न आल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. तसेच संजय राठोड यांना दिलेल्या मंत्रीपदावरुन देखील सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया दिली आहे.

आक्षेप लवकरच दूर होईल

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, विस्तार झाला तर हे सरकार पडेल, असे काही जण म्हणत होते. विस्तारही झाला आणि सरकारही मंत्री झाला नाही. तसेच एकाही महिलेला मंत्रीपद न देण्यात आल्यामुळे सरकारवर टीका होत आहे. पण हा आक्षेप लवकरच दूर होईल आणि महिलांना या मंत्रिमंडळात योग्य ते प्रतिनिधीत्व देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः राठोडांना मंत्री करण्याचा निर्णय कोणाचा?, भाजपच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितले)

तसेच महाविकास आघाडी सरकारने पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तार केला तेव्हा 5 मंत्र्यांमध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यांनी आधी आरसा पहावा

तसेच या सरकारमधील मंत्र्यांची यादी देत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्याला देखील फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असतील आणि अनेक नेत्यांवर जर का खटले चालू असतील अशा पक्षाला अशी यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी आरसा पहावा आणि मग अशी यादी द्यावी, असा टोलाही फडणवीस यांनी गावला आहे.

(हेही वाचाः ‘हा छोटा मंत्रिमंडळ विस्तार, पण…’, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकरांची पहिली प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.