‘बिल भरलं नाही तर…’, ऊर्जामंत्र्यांनी नेत्यांनाच दिला इशारा

154

वीजेची थकबाकी भरण्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाकडून सातत्याने सर्वसामांन्यांना आवाहन करण्यात येत आहे. पण विभागाने दिलेल्या नव्या यादीनुसार, राज्यातील नेत्यांनीच करोडो रुपयांची वीज बिलं थकवली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांप्रमाणे नेत्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वांना नियम सारखे

हे सर्व नेते सुज्ञ आहेत आणि ते नक्कीच आपलं थकीत वीज बिल भरत असते. सर्वांसाठी नियम हा सारखा आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांवर ज्याप्रमाणे नियमानुसार कारवाई होत असते, तशीच कारवाई इतरांवरही केली जाईल, त्यातून कोणीही वगळले जाणार नाही, असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

(हेही वाचाः राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल, वाचा कोणाची किती थकबाकी)

कोणाची किती थकबाकी?

राज्यातील एकूण 372 राजकीय व्यक्तींकडे तब्बल 1 कोटी 27 लाखांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याचे समजत आहे. यामध्ये राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांबरोबरच भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच तब्बल 4 लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे 70 हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे.

(हेही वाचाः गॅस दरांचा नवा उच्चांक, मुंबईतले दर वाचून होईल संतापाचा ‘भडका’)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी 2 लाख 63 हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे. त्याचबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे 1 लाख 25 हजारांची थकबाकी आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे 1 लाख, शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांचे 1 लाख 50 हजार, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे 7 लाख, भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचे 3 लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे समजत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.