…पण भावनेच्या पलिकडे विकास असतो, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची प्रतिक्रिया

83

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणतही सेलिब्रेशन आम्ही केलेले नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेले भाषण हे केवळ भावनिक होते. पण भावनेच्या पलिकडे विकास असतो, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – ‘ठाकरे’ सरकार पडल्यानंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट चर्चेत!)

आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा असल्याचा दावा त्यांनी केला. या गटात न आलेल्या १६ आमदारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सेलिब्रेशन झाले नाही. त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे दुःख वाटत आहे. आमची भूमिका शेवटपर्यंत समजून न घेतल्याने ही वेळ आली असल्याचे केसरकरांनी गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यापुढे ते असेही म्हणाले, आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे. मागील काही दिवसांपासून फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. विविध प्रतिक्रिया देत संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आमचा बंड हा केवळ विचारधारेचा

सरकार येत असतात आणि जात असतात पण विचार महत्त्वाचा असतो. आम्ही शिवसेनेचेचे आहोत, शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा हा एक विचार आहे. त्यामुळे आमचा कोणता वेगळा गट नाही, असे म्हणत केसरकरांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली. आमचा मंत्रीपदासाठी बंड असेल तर मग आमच्याकडे 6 मंत्री सोबत का आले हा देखील विचार झाला पाहिजे, आमचा बंड हा केवळ विचारधारेचा होता, असेही केसरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.