एसटीच्या विलीनीकरणावर  सरकार  महाधिवक्त्यांशी  चर्चा करणार!

106

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या विषयावर राज्य सरकार राज्याचे महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी याविषयावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी काय भूमिका घ्यायची, यावर आता राज्य सरकार चर्चा करत आहे.

कामगारांच्या प्रकृती खालावल्या

तब्बल १३ दिवस एसटी कामगार आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. आता त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कामगारांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. अनिल जाधव नावाच्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सोमवारी उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या अधिकाधिक कामगारांना आझाद मैदानात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा एसटीच्या खासगीकरणावर काय म्हणाले अनिल परब? वाचा…)

सरकारचे तेरावे घालणार – सदाभाऊ खोत

एसटी कामगार आता महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घालणार आहेत. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निलंबनाच्या मागणीला जोर देणार आहेत, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणतात एअर इंडिया विकणाऱ्यांनी एसटीवर बोलू नये. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, हा मोर्चा एसटीच्या कामगारांचा आहे. इतके दिवस आंदोलनाला बसलेले एसटीचे कामगार काही लहान नाहीत, असेही खोत म्हणाले. राज्यभरातून परिवहन मंत्र्यांना साडी-चोळी कुरियरने पाठवा, असे आवाहनही एसटीच्या कामगारांना करण्यात आले, असेही खोत म्हणाले.

आंदोलनाची नवी दिशा ठरवणार – गोपीचंद पडळकर

यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनाची आम्ही आता नवीन दिशा ठरवणार आहे. कामगार अजिबात मागे हटणार नाही. हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोवर सरकार मागण्या मान्य करत नाही, तोवर काहीही झाले तरी आंदोलन सुरूच राहणार, असे पडळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.