महाविकास आघाडीचे सरकार कमकुवत, केव्हाही पडेल! अमृता फडणवीसांचे भाकीत 

राज्यपालांसारखे कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

82

राज्यातील महविकास आघाडी सरकार फारच कमकुवत झाले आहे. हे सरकार केव्हाही पडू शकेल, त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष राज्याला पर्याय देईल, असे भाकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुणे येथे एक कार्यक्रमात केले.

सरकार पडावे सर्वांचा ध्यास!

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृता फडणवीस पुण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. जे नेते दिल्लीमध्ये गुरुवारी भेटत आहेत, ते अगोदरपासून भेटत आले आहेत. अचानक भेटले नाहीत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. हे सरकार पडावे, असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. जर हे सरकार पडले, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असेही त्या म्हणाल्या. भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असे आपण म्हणता, पण भाजपा नेमके कुणाला सोबत घेणार?, असे विचारले असता,  ‘मी यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल’, असे त्या म्हणाल्या.

(हेही वाचा : सरकार नसलेल्या राज्यांत भाजप राज्यपालांकरवी सत्ता राबवते!)

राज्यपाल चांगली व्यक्ती! 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केले. राज्यपालांसारखे कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.