राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाला मिळाल्या किती जागा? वाचा सविस्तर

159

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीची देखील चांगली कामगिरी आहे.

  • नंदूरबारमध्ये भाजपने आतापर्यंत 9 तर काॅंग्रेसने 7 आणि ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायत जिंकली आहे.  विजयकुमार गावित हे भाजपमध्ये आले होते. त्यांना भाजपने मंत्रीपद दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढताना दिसत आहे.
  • 1 हजार 165 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे. यापैकी 100 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजपने 23, शिंदे गटाने 14, ठाकरे गटाने 15, काॅंग्रेसने 9 आणि राष्ट्रवादीने 17 तर इतरांनी 22 जागा जिंकल्या आहेत. भिवंडीत मनसेने खाते खोलले आहे.
  • नागपुरात काॅंग्रेसने खाते उघडले आहे. नागपुरातील अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. याठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. तर नाशिकच्या उंपरपाड्यात विकास आघाडीचा सरपंच झाला आहे.

( हेही वाचा: नंदुरबारमध्ये 9 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय; वाचा सविस्तर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.