महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा; ३० जूनला सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी

81

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचे हे पत्र आहे. मंगळवारी रात्री हे पत्र पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर, आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा असणार आहे.

सरकारने बहुमत गमावल्याचा दावा

शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. मंगळवारी भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर, रात्री मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा त्यांनी दावा केला.

( हेही वाचा भाजपाने दिलेल्या बहुमत चाचणीच्या प्रस्तावानंतर राज्यपालांनी बोलावले ३० जून रोजी विशेष अधिवेशन )

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले नाराज आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमधून ही माहिती दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.