मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंचं पहिलं ट्विट

89

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री उशीरा राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देताना पहिल्यांदा ट्विट केले.

काय केले शिंदेंनी ट्विट

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे कोसळले. त्यानंतर राजकीय वर्तुळात येत्या एक ते दोन दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, मंत्रिमंडळ कशा प्रकारे असेल याची देखील चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळात कोणाला कोणती मंत्रीपदं देण्यात यातील अशा संभाव्य चर्चांना वेग आला असताना एकनाथ शिंदेंनी ट्विट केले आहे. आज एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसे असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याआधीच एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं ट्विट केले आहे.

(हेही वाचा – रस्ते घोटाळ्याप्रकरणी बच्चू कडूंना क्लीन चीट; फाईल क्लोज)

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली असून मंत्रिपदं, खातेवाटप याविषयी एकनाथ शिंदेंनी ट्विट केले आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे ट्विट करून शिंदेंनी एकप्रकारे आवाहन केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.