आळशी राजाचे राज्य टिकत नाही; बच्चू कडूंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

85

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, माजी मंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वी आपली नाराजी जाहीरही केली होती. मात्र, सरकारने राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागास मंजुरी दिल्याने कडूंची नाराजी दूर झाल्याचे दिसते. आता कडू यांनी एका कार्यक्रमादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. आळस काढत असलेल्या राजाचे राज्य टिकत नाही, असे कडू यांनी म्हटले.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, स्टेअरिंग मात्र शिंदेंच्या हाती )

 मी दिव्यांग मंत्रालय मागितले

मी राजा झालो म्हणून झोपायचे ठरलेले, वेळातच भेटायचे असे होता कामा नये. एक तर राजा व्हायचेच नाही आणि राजा झालोच तर मग आळस काढत असेल तर त्या राजाचे राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिले, असे आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरु होती तेव्हा प्रत्येक जण चांगले खाते मागत होते. सगळ्या गोष्टींनी वजनदार खाते मागण्याची रेस सुरु होती. पण, मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितले, अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. मात्र, कडू यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केल्यामुळे आता त्यांची नाराजी दूर झाल्याचीही चर्चा होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.